शारदा पीठ हे प्राचीन भारतातील एक अतिशय महत्त्वाचे धार्मिक आणि शैक्षणिक केंद्र होते. आज पाकिस्तान-अधिकृत काश्मीर (PoK) मध्ये असलेले हे स्थळ, एकेकाळी संस्कृत पांडित्य, वेदविद्या आणि तत्वज्ञानाचे जागतिक केंद्र होते. या ठिकाणी शारदा लिपीचा विकास झाला आणि शेकडो शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, कवी येथे शिक्षण घेत असत. आजही शारदा पीठ काश्मिरी पंडितांसाठी पवित्र ‘कुलदेवीचे स्थान’ मानले जाते.
इतिहास व वैशिष्ट्ये
- शारदा पीठची स्थापना इ.स.पू. २७३ मध्ये अशोक सम्राटाच्या काळात झाल्याचे मानले जाते.
- हे विद्यापीठ नालंदा व तक्षशिला प्रमाणेच एक प्रमुख ज्ञानपीठ होते.
- येथे शारदा देवीचे मंदिर असून, ती विद्येची देवी म्हणून पूजली जाते.
- याच ठिकाणी शारदा लिपीचा जन्म झाला, जी एक काळ संस्कृत हस्तलिखितांच्या लेखनासाठी वापरली जात होती.
- काल्हण (राजतरंगिणी), आदि शंकराचार्य, वैरोट्सना, कुमारजीव आणि थोन्मी संभोटा यांसारखे विद्वान या विद्यापीठाशी संबंधित होते.
- येथे धर्म, खगोलशास्त्र, तत्वज्ञान, इतिहास, भूगोल, संरचनात्मक विज्ञान आणि बौद्ध धर्माचे शिक्षण दिले जात होते.
- शारदा पीठ हे ५१ शक्तीपीठांपैकी एक असून, येथे सतीचे उजवे हात पडले, अशी श्रद्धा आहे.
भौगोलिक स्थान:
- शारदा पीठ हे नीलम व्हॅलीतील शारदा गावात स्थित आहे, जे किशनगंगा आणि मुद्हुमती नद्यांच्या संगमाजवळ आहे.
- श्रीनगरपासून सुमारे १३० किमी अंतरावर असून, मुजफ्फराबादपासून १५० किमीवर आहे.
वर्तमानस्थिती व अलीकडील घडामोडी
- १९४७ च्या फाळणीनंतर हे क्षेत्र पाकिस्तानच्या ताब्यात गेले आणि शारदा पीठ ओस पडले.
- १९४७-४८ च्या भारत-पाक युद्धानंतर या भागात भारतीय नागरिकांना प्रवेश मिळाला नाही.
- २०२३-२४ मध्ये भारत सरकारने या पवित्र स्थळाच्या ‘शारदा पीठ कॉरिडॉर’ साठी प्रयत्न सुरू केले.
गृहमंत्री अमित शहा यांनी २०२४ मध्ये जाहीर केले की, भारत सरकार शारदा पीठ कॉरिडॉर उघडण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून भाविकांना दर्शन घेता येईल. परंतु पहलगाम आतंकवादी हल्ला अंड त्यानंतर ओपेरातीओन सिंदूर बघता कार्तार्पूर कॉर्रीदोर सारखे ह्या प्रकल्पाला यश मिळेल कि नाहीह्या बाबतीत शंका आहे.
Subscribe Our Channel